कडक उन्हाळ्याचे दिवस होते एका कावळ्याला खूप तहान लागली होती तो पाण्यासाठी सारखा इकडे तिकडे फिरत होता पण काही केल्या त्याला पाणी मिळेना उन्हाळा असल्यामुळे सर्व नद्या आणि तलाव कोरडे पडले होते .त्याने सगळीकडे पाण्याचा शोध घेतला पण पाणी काही मिळेना .
शेवटी शोधता-शोधता त्याला एका घराच्या बागेत एक रांजण दिसला कावळ्याने त्या राजानात डोकावून पाहिले त्यात थोडे पाणी होते त्याला खूप आनंद झाला तो पाणी पिण्याचा प्रयत्न करू लागला पण पाणी तळाशी असल्यामुळे त्याला पाणी पिता आले नाही .
खूप विचार केल्यानंतर कावळ्याचा डोक्यात एक कल्पना आली जमिनीवरील एक एक दगड उचलून तो रांजणात टाकू लागला हळूहळू रांजनातील पाणी वर येऊ लागले असे करता करता रांजणातील पाणी वर आले व कावळा ते पाणी प्यायला व आनंदाने उडून गेला.
तात्पर्य - इच्छाअसली तर मार्ग सापडतो
0 टिप्पण्या