निरोप समारंभ
विद्येची देवता माता सरस्वती यांची प्रतिमा आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष महोदय माझ्या शाळेतील सर्व शिक्षक व खाली बसलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींना आज आम्ही वर्ग दहावी व बारावीचे सर्व विद्यार्थी नववी व अकरावी वर्गाकडून निरोप घेत आहोत.
आजचा दिवस हा आम्हाला फार दुःख देणारा दिवस आहे आम्ही या शाळेत सातवीपासून शिक्षण घेत आहोत या शाळेचा चपराशी पासून ते हेडमास्तर पर्यंत आम्हाला प्रेमाच्या मोहान बुडविल आहे .सर्व वर्गाचे विद्यार्थी मिळून खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्रमात हातभार लावत होतो शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर आहे मंदिर आहे या पवित्र मंदिरात भगवान रुपी शिक्षकांना सोडून जाताना आमचे मन हळहळत आहे .या शाळेच्या आठवणी सदैव मनात राहणार. एक मुलगी जशी आई वडिलांना सोडून जाते तसेच आम्हा विद्यार्थ्यांचा किस्सा.
हे विद्यार्थी मित्रांनो आपण जास्त दुःख व्यक्त करू नका कारण या जगात एक ना एक दिवस असेच प्रत्येकाला निरोप द्यावा लागतो हाच निसर्गाचा नियम आहे जसे पानांना झाडापासून मुलींना आई-वडिलांपासून.
आज एक गोष्ट बोलावेसे वाटते ती अशी की वर्गात बरेच मुले मुली असतात काही मुलं अभ्यासात कमजोर असतात त्यांना शिक्षक रागवत आहे म्हणून त्यांनी शिक्षकांचा राग मानू नये कारण शिक्षक एक देवता आहे. विद्यार्थी जीवनातच शिक्षक मिळतो मनुष्याच्या जन्मात विद्यार्थी जीवन फक्त एकदाच येते आजपर्यंत शिक्षकांनी जे काही बोलले ते आमच्या चांगल्याकरीता. त्यांच्या बोलण्यात मागे प्रेम असते हाच राग द्वेष सोडून द्या आज सरांना सुद्धा या गोष्टीचा काहीतरी प्रभाव पडत असेलच या शाळेतून अनेक प्रकारे आपण शिकलो आहोत अनेक महत्त्वाचे जीवनात प्रभावी पडणाऱ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाले आहे.
मित्रांनो आमच्याकडून काही चुकल असेल तर आम्हाला माफ करावे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या पेक्षा लहान आहात आमच्या कडून जे छान घडले त्यांना आपल्या आपल्या आचरणात आणा वाईट घडले त्यांना सोडून द्याआणि सर्वांना सुद्धा विनंती करते की आमच्याकडून जे काही चुकले असेल तर माफ करावे व आम्ही पुढे यशाचे शिखर गाठवे असाच आशीर्वाद द्यावा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय भारत
0 टिप्पण्या