महात्मा ज्योतिबा फुले

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो.

 आज दिनांक 11 एप्रिल 2010 मला आज आपल्यासमोर दोन गोष्टी सांगायला आपण संधी दिल्याबद्दल फार फार धन्यवाद तर मित्रांनो मी त्या महान व्यक्ती बद्दल बोलत आहे त्यांनी खालील पंक्ती लिहील्या.

 विद्येविना मती गेली. मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली. गतीविना वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले.

 इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव हे सातारा जिल्ह्यातील कंटगुन गावचे मूळ रहिवासी होते मित्रांनो त्यांचे आडनाव पूर्वी गोरे होते परंतु त्यांचा फुलाचा व्यवसाय होता म्हणून त्यांना लोक फुले म्हणू लागले व कायमचे ते पुढे फुले झाले .या मुलाने शाळा शिकू नये म्हणून काही लोकांनी त्यांची बुद्धी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या वडिलांनी तेराव्या वर्षीच ज्योतिबाचा विवाह झगडे पाटील च्या मुलीशी म्हणजे सावित्रीबाई या मुली सोबत लावून दिला परंतु विद्यार्थीमित्रांनो ज्योतिबाचे चातुर्य आणि कौशल्य पाहून एका मुसलमान समाजातील उर्दू शिक्षक गफार बॅग मुंशी यांनी त्यांच्या वडिलांना जोतिबाला शाळेत पाठवा म्हणून गांभीर्याने सांगितले.

 त्यांना पुढे इसवीसन 1841 मध्ये एका स्कॉटिश मिशनरी शाळेत दाखल केले त्यांनी शिवाजी महाराज व वाशिंग्टन यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगतो ज्योतिराव जेव्हा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते त्या वरातीमध्ये त्यांचा शूद्र म्हणून अपमान केला व त्यांना वरातीच्या मागे व्हा म्हणून सांगितले सहजच गोष्ट एवढा मोठा अपमान सहन करणार अज्ञानरूपी अंधाराला दूर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात 1848 ला भरविली त्याकाळी शिक्षक मिळत नव्हते त्यांनी सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिका बनविले हाती परिस्थितीमुळे काही दिवस त्यांना शाळा बंद ठेवावी लागली 1851 मध्ये चिपळूणकरांच्या वाड्यात शाळा सुरू केली त्यात 48 मुली शाळेत येत होत्या मित्रांनो सरकारी शाळेत दहा पटीने विद्यार्थी ज्योतिबा फुले शिक्षण घेत होते म्हणून एका ज्ञानप्रकाश वर्तमानपत्रात लिहून आले की सर्व जातीच्या समाजाच्या मुलांसाठी ज्योतिराव फुले मोठी मेहनत करून शिकवतात त्यांना बोर्डामार्फत शालजोडी देऊन 1852 सत्कार केला पूर्वी मुलींना स्त्रियांना पुरुषाबरोबर मान नव्हता चूल आणि मूल एवढेच मुलींचा आयुष्य होतं.

महात्मा ज्योतिबा फुलेंनी बालविवाह थांबविला व पुनर्विवाह घडवून आणला विधवा स्त्रीला पुन्हा समाजात लग्न करुन देण्याचा अधिकार मिळवून दिला.

पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या स्त्रियांना आपल्या अर्भकाची हत्या करावी लागेल म्हणून भारतात प्रथम जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले त्यांनी विधवा बाई तिच्या चुकीमुळे गरोदर झाली असेल तर ती तिने गुप्तपणे व सुरक्षितपणे बाळा तेव्हा तुम्ही तुमचे मूल न्यावे किंवा येथे ठेवावे हे तुमच्या मर्जीवर अवलंबून राहिल . त्या काळजीअनाथाश्रम घेईल त्यावेळेस काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेला मुलगा झाला जोतिबांनी त्यांचे नाव यशवंत ठेवले व त्याला दत्तक घेतले एवढे महान कार्य करून एक व्यक्ती अनेक मुलीशी लग्न करू नये व पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने केस कापू नये म्हणून त्यांनी ह्या प्रथा बंद केल्या पुढे त्यांनी शेतकर्यांचा आसूड हा ग्रंथ इसवी सन 1885 मध्ये लिहिला त्याचा दत्तक पुत्र यशवंत ने ही हडपसर समाजाच्या राधा बरोबर लग्न केले वतीने ज्योतिबाची खूप काळजी घेतली तिचे नाव चंद्रभागा ठेवले होते मित्रांनो या महान व्यक्तीने पुण्यात प्लेगची साथ असताना सुद्धा स्वतःची पर्वा न करता लोकांना दवाखान्यात नेले परंतु हे कार्य करत असतानाच 27 नोव्हेंबर 1890 बुधवार रोजी त्यांची प्रकृती खूप बिघडली त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यांनी या जगाला कायमचा रामराम ठोकला अशा महापुरुषांची वेळोवेळी ह्या आपल्या भारत देशात जन्म घ्यावा देशाला बहुमान,कीर्ती मिळत रहावी.एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद जय भारत.