कोल्ह्याला द्राक्ष आंबट
एकदा एका जंगलातून कोल्हा फिरत फिरत द्राक्षाच्या मळ्यात आला वेलीवर त्याला पिकलेल्या द्राक्षांचे खूप घड दिसले त्याच्या तोंडाला पाणी सुटले.
कोल्ह्याने वेलीवरील द्राक्षे मिळविण्यासाठी खूप उड्या मारल्या पण तो द्राक्षं पर्यंत काही पोचू शकला नाही द्राक्ष खूप उंच होती तो मागील पायावर उभा राहिला तरी सुद्धा तो द्राक्षं पर्यंत पोहोचू शकला नाही.
शेवटी कोह्ल्याने खूप उड्या मारल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर तो खूप दमला व तिथून निघाला जाता जाता शेवटी तो म्हणाला द्राक्ष आंबट आहेत ती कोण खाणार
तात्पर्य -नेहमी खिलाडू वृत्तीने विचार करावा
0 टिप्पण्या